Posts

Showing posts from August, 2022

श्री गणेश आरती मराठी

      सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।      नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।।      सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।       कंठी झळके माळ मुक्ताफळांची ।।१।।     जय देव, जय देव जय मंगलमूर्ती ।     दर्शनमात्रे मात्रे मन कामना पुरती ।। ध्रू‌ ।।     रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।     चंदनाची उटी कुमकुम केशरा ।।      हरेजडीत मुकुट शोभतो बरा ।      रूनझुणती नूपुरे चरणी घागरीया ।।२।।            ।। जय देव जय देव० ।।      लंबोदर पितांबर फणिवर बंधना ।      ‌‌सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।।      दास रामाचा वाट पाहे सदना ।     संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे,‌ सुरवरवंदना ।।३।। ‌            ।। जय देव जय देव० ।।                           

गणेश चतुर्थी व्रत कथा मराठी

    एकदा महादेव आणी पार्वती माता नर्मदा नदीच्या काठी गेले. तेथे पार्वतींनी महादेवांसोबत एका सुंदर ठिकाणी चौपद खेळण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा महादेव म्हणाले की, आपल्या पराभवाचा आणी विजयाचा साक्षीदार कोण असेल? तेव्हा पार्वती मातेने तिथल्या गवतातून पेंढया गोळा केल्या आणी एका बालकाचा पुतळा बनविला आणी त्यामध्ये प्राण प्रतिष्ठा करून त्यांना म्हणाल्या, बाळा! आम्ही चौपद खेळतो. खेळाच्या शेवटी कोण जिंकेल, कोण हरेल हे तु ठरवायचं.    खेळाला सुरुवात झाली. महादेव आणी माँ पार्वती चौपद खेळू लागले. योगा- योगाने पार्वती मातांनी तिन्ही वेळा खेळात विजय मिळवीला. शेवटी जेव्हा त्या बालकाला जय- पराजयाबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने महादेवांना विजयी घोषित केले. यामुळे माता पार्वती रागावल्या आणी पार्वती मातांनी क्रोधित होऊन त्या बालकाला एका पायाने लंगडा होऊन तेथेच चिखलात पडून दुःख भोगण्याचा श्राप होता. बालकाने नम्रपणे सांगितले, आई, माझ्या अज्ञानामुळे हे घडले आहे. मी हे काही रागाने अथवा कुटीलपणाने केले नाही.तुम्ही मला माफ करा.      तेव्हा पार्वती मातांनी त्याला सांगितले ...

कथा हरितालिकेची मराठी

     एके दिवशी शंकर पार्वती कैलासपर्वतावर बसले होते. पार्वतीनं शंकरांना विचारलं की, स्वामी सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं? आणी कोणत्या पुण्याईनं मी आपल्या पदरी पडले हेही मला सांगा.     तेव्हा शंकर म्हणाले, जसं नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ, नंद्यामध्ये गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तु पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणी त्याच पुण्यानं तु मला प्राप्त झालीस. हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तु कसं केलंस ते मी तुला आता सांगतो.      तु लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. चौसष्ठ वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन हे तिन्ही दुःख सहन केलंस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी? अशी चिंता त्यांना पडली.     इतक्यात तिथे नारदमुनी आले. हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारदमुनी म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे त...