Posts

वटपौर्णिमा मराठी कथा

      फार पूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा होता. त्याला सावित्री नावाची एक अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. पुढे सावित्री उपवर झाल्याने राजाने तिलाच आपला पती निवडण्याची संधी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या एका राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याच्या ध्रूमत्सेन नावाच्या अंध राजाचा पुत्र होता. तो राजा शत्रुकडून हरल्याने आपल्या राणी (पत्नी) व पुत्रासह जंगलात राहत होता. सत्यवान हा शूर व गुणी होता; पण तो अल्पायुषी होता.     भगवान नारदांना सत्यवान अल्पायुषी होता हे माहित होते म्हणून, सावित्रीने सत्यवानाशी विवाह करू नये असे त्यांना वाटत होते. नारदांनी सावित्रीला तिचा होणारा पती (सत्यवान) हा अल्पायुषी आहे हे सावित्रीला सांगितले व, तु सत्यवानाशी विवाह करू नकोस असा सल्ला दिला परंतु, सावित्रीचे सत्यवानावर प्रेम असल्याने तीने सत्यवानाशी विवाह केला.     विवाहानंतर सावित्री आपल्या पती सत्यवान समवेत व सासू- सासऱ्यांसोबत जंगलात राहू लागली. सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसांवर येऊन ठेपला, तेव्हा सावित्रीने तीन दिवस कठोर व्रत उपवास केला. तीन दिवसा...

कोणत्या देवांची किती प्रदक्षिणा करावी

१) भगवान शंकरांची अर्धी प्रदक्षिणा केली जाते. २) माता दुर्गांची एक प्रदक्षिणा केली जाते. ३) श्री मारुतींची आणी भगवान गणेशांची तीन प्रदक्षिणा करावी. ४) भगवान विष्णूंची चार प्रदक्षिणा केली जाते. ५) सूर्यदेवांची सात प्रदक्षिणा केली जाते.      ज्या देविदेवतांचे प्रदक्षिणाचे विधान प्राप्त नाही, त्यांची तीन प्रदक्षिणा केली जाते.

श्री हनुमान जयंती मागील पौराणिक कथा

      श्री हनुमंतांना महादेवांचे ११ वे रुद्रावतार म्हटले जाते.श्री हनुमान हे प्रभू रामांचे परमभक्त आहेत. हनुमानांचा जन्म वानरकुळात झाला. हनुमानांचा जन्म राजा केसरी व अंजना मातेच्या पोटी झाला. अंजना मातेंना विवाहपश्चात कित्येक वर्ष झाले परंतु, त्यानां एकही पुत्र नसल्याने त्या दुःखी होत्या. म्हणून त्या शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपस्या करतात. अंजना मातेची घोर तपस्या पाहून महादेव प्रसन्न होतात व त्यांना वरदान मागण्यास सांगतात. यावर माता अंजना 'तुम्ही माझ्या पुत्ररूपात जन्म घ्या' असे वरदान मागतात. त्यावर महादेव तथास्तु म्हणतात.     सुमेरू येथे केसरी राजाचे राज्य होते. कलियुगात संकटांचे हरण करणारा एकमेव हनुमान जागृत देवता असल्याचे म्हटले जाते. म्हणूनच बोलतात, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान  एकमुखाने बोला, बोला जय जय हनुमान.  हनुमंतांना मारुती, पवनपुत्र, पवनसूत, बजरंबली, आंजनेय, केसरीनंदन, अशा अनेक नावाने ओळखले जाते. हनुमानांचे शस्त्र 'गदा' आहे. हनुमानाला तेल, शेंदूर, रुईची फुलं‌ पानं अर्पण केले जाते.     रामायण युद्धादरम्यान मेघनाथ ने ल...

श्रीकृष्ण जन्माष्टमी कथा

      भगवान विष्णूंनी द्वापारयुगात दृष्टांच्या संहारासाठी पृथ्वीलोकावर 'कृष्ण' नावाने अवतार घेतला. अवतार म्हणजे, पुनर्जन्म घेतला. श्रीकृष्ण हे आपल्या सर्वांच्या अंतरंगातील आनंदमय असे तत्त्व आहेत. श्रावण मासातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री १२ वाजेच्या आसपास रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णांचा जन्म झाला.     कृष्णाचा मामा कंस याने, देवकीच पुत्र तुझा वध करेल ही आकाशवाणी ऐकून स्वतःची सख्खी बहीण देवकीला व देवकी मातेचे पती वासुदेव यांना कैदेत ठेवलं होत. देवकी गरोदर झाल्यावर प्रत्येकवेळी तिला नजरकैदेत ठेवलं जात असे. देवकीच्या प्रत्येक नवजात बालकाला कंस स्वतःच्या हाताने ठार करत असे. अशा प्रकारे कंसाने देवकी आणि वासुदेवाची सात अपत्ये ठार केली होती.     देवकीच्या पोटी आठव्या अपत्याचा जन्म झाला, ते आठवे अपत्य श्रीकृष्ण होते. श्रीकृष्णांचा जन्म झाला त्यावेळी तुरुंगाचे रक्षक झोपी गेले होते या संधीचा फायदा घेऊन वासुदेवांनी आपले आठवे अपत्य मारले जाऊ नये, म्हणून श्रीकृष्णांचा जन्म झाल्यानंतर लगेचच त्यांना गोकुळातील नंद आणि यशोदा यांच्याकडे सुपूर्त केलं होतं. श...

श्री दत्त जयंती पौराणिक कथा

      प्रभु दत्तात्रयांच्या जन्माविषयी अनेक पौराणिक कथा आहेत. 'अवधूत' हे दत्तात्रेयांचे नाव असून या शब्दाचा अर्थ म्हणजे, नेहमी आनंदात रमणारा.   मात्र सर्व कथांमधून प्रभु दत्त हे अत्रीऋषी व अनुसया मातेंचे पुत्र आहेत हे समजते. प्रभु दत्त हे त्रिदेवांचे अवतार म्हणजेच ब्रह्मा, विष्णु व महेश (शिव) या तीनही देवांचे अवतार आहेत. योगसाधनेत प्रभु दत्तात्रेयांना 'गुरु' मानले जाते. प्रभु दत्तात्रेयांनी २४ गुरु केले. प्रभु दत्तात्रेयांच्या पाठीमागे असलेली गाय  म्हणजे पृथ्वी व प्रभुंच्या आसपास असलेले चार श्वान म्हणजे, चार वेदांचे प्रतीक आहे.     प्रभु दत्तांच्या खांद्याला एक झोळी असते याचा भावार्थ असा आहे, श्रीदत्त दारोदारी फिरून झोळीत भिक्षा जमावतात. घरोघरी फिरून भिक्षा मागितल्याने, 'अहं' कमी होतो; म्हणून झोळी ही अहं नष्ट झाल्याचे प्रतीक आहे. श्रीदत्तांच्या हातात आपणांस 'कमंडलू' दिसते. कमंडलू हे संन्याशाच्या सोबत आढळते. संन्यासी हा विरक्त असतो अशात कमंडलू हे एकप्रकारे त्यागाचे प्रतीक दर्शवते. श्रीदत्तांकडे ब्रह्मदेवांचे कमंडलू व जपमाळ, श्रीविष्णूंचे सुदर्शन चक्र व ...

त्रिपुरारी पौर्णिमा महत्वकथा

    त्रिपुरारी पौर्णिमा हा परमात्म्याच्या प्रत्येक स्वरुपाशी विश्वाला ओळख करून देणारा एकमेव अद्वितीय शुभ दिवस मानला जातो. १) परमात्म्याने शिव रूपात त्रिपुरासुराचा वध केला तो हाच दिवस. २) हिमालयकन्या माँ पार्वतींच्या कठोर तपश्चर्येला भुलून त्यांच्या समोर शिवशंकर उभे राहिले तो हाच दिवस. ३) श्री.गणेशांनी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली ती ह्याच दिवशी. ४) भगवान कार्तिकेयांचे देवांचा सेनापती म्हणून निवड केली ती ह्या दिवशी. ५) देवगुरू बृहस्पतींनी प्रभु दत्तात्रेयांच्या श्रीपादश्रीवल्लभ व नृसिंहसरस्वती या अवताराची घोषणा केली तो हा दिवस. ६) भगवान परशुरामांनी बाण मारून समुद्र आटविला तो ह्याच दिवशी. ७) मारुतींनी श्रीराम व सीता मातेचे आपल्या हृदयातील अस्तित्व छाती फाडून समस्त विश्वासाठी खुले केले तो हाच दिवस.  ८) श्री विठ्ठल हे त्यांचा भक्त पुंडलिकाच्या घरी येऊन विठेवर उभे राहिले व पुंडलिकाच्या आग्रहावरून त्या विठेवर मूर्तिरूपात स्थापन झाले ते ह्याच दिवशी. अशी ही दिव्य त्रिपुरारी पौर्णिमा.              Thanks for visiting the blog

भाऊबीजे मागील पौराणिक कथा मराठी

    सूर्यादेवांची पत्नी छाया यांच्या पोटी यमराज आणि यमुना यांचा जन्म झाला. यमराज आणि यमुना दोघेही सख्खे बहीण- भाऊ आहेत. यमुना देवी ने एकदा यमराजांना घरी जेवण्यासाठी बोलावले असता, यमराज व्यस्त असल्यामुळे ते बहिणीकडे जाऊ शकले नाहीत.     एकदा कार्तिक द्वितीयेला आपला भाऊ यमराज अचानक आपल्या दारात आलेला पाहून यमुना खूप आनंदित झाली. तीने यमराजांचे प्रेमाने स्वागत केले आणि भोजन वाढले. बहिणीचे आपल्यावर असलेले प्रेम पाहून यमराज खुश होतात व बहीण यमुना ला वरदान मांगण्यास सांगतात. तेव्हा यमुना म्हणतात की, आजच्या दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जाईल व तिच्याकडून राखी बांधून घेईल व जी बहीण आपल्या भावाला मनोभावे प्रेमाने जेऊ घालेल त्यांना तुम्ही दीर्घायुष्य, सुख- समृद्धी प्रदान कराल.     यावर यमराज तथास्तु म्हणत यमपुरीला निघाले. या दिवशी जो भाऊ बहिणीच्या घरी जाऊन तिचे आदरातिथ्य स्वीकारतो त्याचे आयुष्य वाढते. त्याला व त्याच्या बहिणीला यमाचे भय राहत नाही. अशी ही भाऊबीजे मागील पौराणिक कथा.              Thanks for visiting the blog