श्री हनुमान जयंती मागील पौराणिक कथा
श्री हनुमंतांना महादेवांचे ११ वे रुद्रावतार म्हटले जाते.श्री हनुमान हे प्रभू रामांचे परमभक्त आहेत. हनुमानांचा जन्म वानरकुळात झाला. हनुमानांचा जन्म राजा केसरी व अंजना मातेच्या पोटी झाला. अंजना मातेंना विवाहपश्चात कित्येक वर्ष झाले परंतु, त्यानां एकही पुत्र नसल्याने त्या दुःखी होत्या. म्हणून त्या शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपस्या करतात. अंजना मातेची घोर तपस्या पाहून महादेव प्रसन्न होतात व त्यांना वरदान मागण्यास सांगतात. यावर माता अंजना 'तुम्ही माझ्या पुत्ररूपात जन्म घ्या' असे वरदान मागतात. त्यावर महादेव तथास्तु म्हणतात. सुमेरू येथे केसरी राजाचे राज्य होते. कलियुगात संकटांचे हरण करणारा एकमेव हनुमान जागृत देवता असल्याचे म्हटले जाते. म्हणूनच बोलतात, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एकमुखाने बोला, बोला जय जय हनुमान. हनुमंतांना मारुती, पवनपुत्र, पवनसूत, बजरंबली, आंजनेय, केसरीनंदन, अशा अनेक नावाने ओळखले जाते. हनुमानांचे शस्त्र 'गदा' आहे. हनुमानाला तेल, शेंदूर, रुईची फुलं पानं अर्पण केले जाते. रामायण युद्धादरम्यान मेघनाथ ने ल...